IND vs ZIM 3rd T20I Match : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात (Zimbabwe vs India 3rd T20I) टीम इंडियाने 23 धावांनी विजय मिळवला. भारताने तिसऱ्या सामन्यात 23 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात पराभवाचा स्विकार करावा लागल्यानंतर टीम इंडियाने चॅम्पियन शैलीत खेळली अन् सलग दोन सामने नावावर केले. कॅप्टन शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली टीम इंडिया उत्तम कामगिरी करत असतानाच आता एक निर्णय टीम इंडियाच्या अंगलट येऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर 183 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय संघासाठी कर्णधार शुभमन गिलने 66 रन्सची अर्धशतकी खेळी केली. मात्र, दुसऱ्या बाजूने शुभमनने चुकीचा जोडीदार निवडला. दुसऱ्या डावात शतक ठोकणाऱ्या अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) शुभमन गिलने सलामीसाठी पाठवलं नाही. ज्याच्या जागी यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याला संधी देण्यात आली होती. शुभमन गिल आणि टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय पूर्णपणे फसल्याचं दिसून आलं. चांगली सुरूवात करून देखील टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही.


यशस्वी जयस्वालला चांगली सुरूवात मिळाली परंतू त्याची गाडी 36 धावांवर अडखळली. जयस्वाल बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माला देखील वन डाऊनला सुर गवसला नाही. तो 10 धावा करत बाद झाला. त्यामुळे शतकवीर अभिषेक शर्माला तिसऱ्या क्रमांकावर खेळायला पाठवण्याचा निर्णय पूर्णपणे चुकल्याचं दिसून आलंय. 



भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, अभिषेक शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), रूतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद.


झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमणी, वेस्ली मधवेरे, ब्रायन बेनेट, डायन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), जॉनथन कॅम्पबेल, क्लाइव्ह मदांडे (विकेटकीपर), वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.