कोलंबो : चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या शतकामुळे श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर ३४४/३ एवढा झाला होता. दिवसाअखेरीस चेतेश्वर पुजारा नाबाद १२८ रन्सवर तर अजिंक्य रहाणे नाबाद १०३ रन्सवर खेळत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये १९० रन्स करणारा शिखर धवन या इनिंगमध्ये ३५ रन्स करून आऊट झाला तर के.एल.राहुल ५७ रन्सवर रनआऊट झाला. मागच्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शतक झळकवणाऱ्या विराटला मोठी धावसंख्या करता आली नाही. विराट १३ रन्स करून आऊट झाला. श्रीलंकेकडून हेराथ आणि परेरानं प्रत्येकी एक विकेट घेतली.