मुंबई : तिरंगी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात भारताला जिंकण्यासाठी १८७ धावांची आवश्यकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या. यात ऑस्ट्रेलियाची सलामीवीर मूनीने ७१ धावांची जबरदस्त खेळी केली. तर एलिस विलानीने ६१ धावा कुटल्या.


भारताकडून पूजा वस्त्रकरने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर झुलन गोस्वामी, पूनम यादव आणि आरपी यादवने प्रत्येकी एक विकेट घेतली. 


मालिकेत टिकून राहायचे असेल तर भारताला या सामन्यात जिंकावेच लागेल. याआधी भारताला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव सहन करावा लागला.