लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय बॉलर्सनी अफलातून कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त १९१ रन्समध्ये ऑल आऊट झाला आहे. बॉलर्सबरोबरच भारतीय खेळाडूंनी चपळ क्षेत्ररक्षण करून आफ्रिकेला २०० रन्सच्या आत रोखलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या तीन खेळाडूंना भारतीय क्षेत्ररक्षकांनी रन आऊट केलं आहे. तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या. अश्विन, पांड्या आणि जडेजाला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं. या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये क्वालिफाय होईल. 


या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पण सुरुवातीला आफ्रिकेचे ओपनर क्वान्टन डिकॉक आणि हशीम आमलानं सावध सुरुवात करत ७६ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप केली. डिकॉकनं ५३ आणि आमलानं ३५ रन्स केल्या तर तीन नंबरला आलेल्या डुप्लेसीला ३६ रन्स करता आल्या. सुरुवातीचे तीन खेळाडू वगळता आफ्रिकेच्या बॅट्समननं भारतीय बॉलर्ससमोर लोटांगण घातलं. या मॅचमध्ये भारतानं उमेश यादवऐवजी आर. अश्विनला संधी दिली होती.