मुंबई : भारत, श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातील वर्ष २०१८ मधील निदहास ट्रॉफीसाठी सिरीज होणार आहे. श्रीलंकेमध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

8 मार्च ते 20 मार्च पर्यंत 7 सामने खेळले जाणार आहे. फायनल सामन्यासाठी एक टीम दुसऱ्या टीमसोबत 2-2 सामने खेळणार आहे. टूर्नामेंटमधील सर्व सामने कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.


बीसीसीआयचे सीईओ राहुल जौहरी यांनी म्हटलं की, आम्हाला या गोष्टीचा आनंद आह की स्वातंत्र्यांच्या 70 व्या वर्षाचं सेलिब्रेशनचं आपण भाग बनत आहोत. श्रीलंका आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे बीसीसीआयसोबत चांगले संबंध आहेत. जेव्हा श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष सुमथिपाला यांनी या सिरीजबाबत सांगितलं तेव्हा आम्ही लगेच यासाठी होकार दिला.