नॉटिंगहम : तिसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच ईशांत शर्मानं इंग्लंडला धक्के दिले आहेत. ईशांत शर्मानं एलिस्टर कूक आणि केटन जेनिंग्स या दोन्ही ओपनरला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवलं आहे. कूक १७ रनवर तर जेनिंग्स १३ रनवर आऊट झाला आहे. तिसऱ्या दिवशी भारतानं इंग्लंडला विजयासाठी ५२१ रनचं आव्हान ठेवलं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची अवस्था २३-० अशी होती. पण चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला दोन धक्के लागले आणि भारतानं या टेस्ट मॅचवरची आपली पकड आणखी मजबूत केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या दिवशी भारतानं ३५२-७ वर डाव घोषित केला. यामुळे इंग्लंडला विजयासाठी तब्बल ५२१ रनचं आव्हान मिळालं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून कर्णधार विराट कोहलीनं शानदार शतक पूर्ण केलं. टेस्ट क्रिकेटमधलं कोहलीचं हे २३वं शतक होतं. विराट कोहली १९७ बॉलमध्ये १०३ रन करून आऊट झाला. विराटच्या या खेळीमध्ये १० फोरचा समावेश होता. भारताच्या बॉलिंगच्या वेळी इंग्लंडच्या ५ विकेट घेणाऱ्या हार्दिक पांड्यानं बॅटिंग करताना ५२ बॉलमध्ये नाबाद ५२ रन केले. तर चेतेश्वर पुजारा ७२ रन करून आऊट झाला.


पाच टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत ०-२नं पिछाडीवर आहे. त्यामुळे सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही टेस्ट मॅच जिंकणं आवश्यक आहे.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा