मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याला टीम इंडियाची फलंदाजी चांगलीच गडगडली आहे. टीम इंडियाचा हा सलामीवीर दुसऱ्या सामन्यातही काही खास कामगिरी करू शकला नाही, त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने 148 धावा केल्या. यादरम्यान संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड अवघी एक धाव काढून बाद झाला. त्याला कागिसो रबाडाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. ऋतुराज गायकवाडला अवघ्या 4 चेंडूत 1 धावा करता आल्या.
ऋतुराजला बाद केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला ट्रोल केले. 



ऋतुराजला बाद केल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांच्याबद्दल अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. ऋतुराजने याआधी दिल्ली टी-20 मध्ये छोटी पण चांगली खेळी केली होती. दिल्लीत त्याने 15 चेंडूत 23 धावा केल्या. ऋतुराजच्या खेळीत 3 षटकारांचा समावेश होता.



दरम्यान  भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी 149 धावांची गरज आहे.