राजकोट : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात आजपासून 2 टेस्ट सिरीजच्या सामन्याला सुरुवात होत आहे. या सिरीजमधला पहिला सामना राजकोटमध्ये खेळला जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत आधी बँटींग करण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सीरीजकडे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी म्हणून देखील पाहिलं जात आहे. पृथ्वी शॉने आजच्या सामन्यातून टेस्ट करिअरमध्ये डेब्यू केलं आहे. भारताला सुरुवातीलाच एक झटका बसला आहे. के. एल राहुल शुन्यावर माघारी परतला आहे. 


भारतीय टीम :


पृथ्वी शॉ, के. एल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, उमेश यादव, कुलदीप यादव, मोहम्मद शामी