केपटाऊन : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु झालेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकन टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकन टीमने ६ विकेट्स गमावत २६९ रन्सपर्यंत मजल मारली. 


पहिल्या टेस्ट मॅचमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. टीम इंडियाकडून रविचंद्रन आश्विनने आपला चांगला परफॉर्मन्स दाखवला. 


टीम इंडियाकडून रविचंद्रन आश्विनने सर्वाधिक म्हणजेच ३ विकेट्स घेतले. इशांत शर्माने एक विकेट घेतला. तर, दोन रन-आऊट झाले. 


दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने ३१ रन्स केले. एडन मार्क्रमने ९४ रन्स केले. आमलाने ८२ रन्स केले यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमला चांगला स्कोर करण्यात यश आलं आहे.