बंगळुरू : आयपीएल २०१९मध्ये रविवारी बंगळुरू आणि चेन्नईमध्ये झालेली मॅच अत्यंत रोमांचक झाली. महेंद्रसिंग धोनीच्या एकाकी झुंजीमुळे चेन्नईने गमावलेल्या मॅचमध्ये पुनरागमन केलं. पण तरी शेवटच्या बॉलवर बंगळुरूचा १ रननी विजय झाला. शेवटच्या बॉलवर २ रनची गरज असताना धोनीच्या बॅटला बॉल लागला नाही. तरी धोनीनं एक रन काढण्याचा प्रयत्न केला. पण पार्थिव पटेलने स्टम्पवर थ्रो मारून बंगळुरूला जिंकवून दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या टीमला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी २६ रनची गरज होती, पण त्यांना फक्त २४ रनच करता आल्या.