मेलबर्न : ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध सध्या सुरू असलेली ही सीरिज पाच मॅचची शेवटची सीरिज असू शकते, असं वक्तव्य क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी जेम्स सदरलँड यांनी केलं आहे. क्रिकेट.कॉम.एयू या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये सदरलँड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ टीम्सची वनडे लीग सुरु झाली तर दोन देशांमधली वनडे सीरिज तीन मॅचचीच होईल, असं स्पष्टीकरण सदरलँड यांनी दिलं आहे. भविष्यामध्ये कोणतीही टीम तीन पेक्षा जास्त वनडे खेळणार नाही कारण आता टी-20 लाही दौऱ्यामध्ये समाविष्ट करावं लागणार आहे, असं सदरलँड म्हणाले.


भविष्यामध्ये वनडे लीग आणि टेस्ट चॅम्पियनशीप सुरु करण्याचा आयसीसीचा विचार आहे. आयसीसीच्या प्रस्तावानुसार वनडे लीगमध्ये सहा मॅच स्वदेशामध्ये तर सहा मॅच परदेशामध्ये खेळाव्या लागणार आहेत.