नवी दिल्ली : महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये इंग्लंडकडून ९ रन्सनी पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचे सर्वच क्रिकेटर नाराज झालेत. विजयाच्या इतक्या जवळ येऊनही पराभव स्वीकारावा लागल्याने कर्णधार मितालीला फारच वाईट वाटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे जेतेपद आमचे होते. मात्र फायनलमध्ये अखेरच्या क्षणी आमचा खेळ चांगला झाला नाही आणि आम्ही जेतेपद गमावले. माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील हा सर्वात दुख:द क्षण आहे. यासाठी मी कोणालाच दोष देणार नाही, या शब्दांत मितालीने आपले दु:ख व्यक्त केले. 


लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात भारताला विजयासाठी २२९ धावा हव्या होत्या. मात्र भारताचा डाव २१९ धावांवर संपुष्टात आला.