मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची सिरीज सुरु आहे. सीरीजमधील चौथा टेस्ट सामना गुरुवारी साउथम्प्टनमध्ये खेळला जाणार आहे. या सिरीज आधी मोहम्मद शमीबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. पत्नीच्या आरोपांमुळे तो मैदानावर चांगली कामगिरी करु शकेल का याबाबत देखील अनेक चर्चा सुरु होत्या. शमीने सीरीजमध्ये चांगली कामगिरी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शमीने एका इंटरव्यूमध्ये म्हटलं की, तो आता या वादातून बाहेर आला आहे. शमीवर त्याची पत्नी हसीन जहानने अनेक आरोप केले आहेत. घटस्फोट घेण्यासाठी तिने शमीकडे मोठी रक्कम देखील मागितली आहे. शमीने म्हटलं की, 'कौटुंबिक वादामुळे मागचे 8 महिने माझ्यासाठी कठीण होते. हे महत्त्वाचं नाही की काय झालं आणि काय नाही झालं. ती वेळ माझ्यासाठी खूप तणावाची होती. मी बराच काळ यामुळे टेन्शनमध्ये होतो.'


शमीने तीन टेस्ट सामन्यांमध्ये 8 सामने जिंकले आहेत. शमीने कर्णधार विराट कोहलीला टीम बदलण्यासाठी देखील सूचवलं. त्याने म्हटलं की, 'आमची स्ट्रेंथ अशी आहे की आम्ही टीममध्ये बदल करु शकतो. जर आम्ही बदल नाही केले तरी आमच्याकडे असे गोलंदाज आहेत जे बराच वेळ बॉलिंग करु शकता. पण बदल करण्याची रणनीती चांगली आहे. कारण यामुळे आम्हाला पुन्हा चांगली कामगिरी करण्याची संधी मिळेल.'