तिरुअनंतपुरम : तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ८ षटकांत ५ बाद ६७ धावा केल्यात. न्यूझीलंडला या सामन्यात विजयासाठी ६८ धावांची आवश्यकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल ३० वर्षानंतर खेळवण्यात येत असलेल्या स्टेडियमवर पावसाने खोडा घातला आणि सामना उशिराने सुरु झाला. ८ षटकांचा सामना खेळवण्यात येतोय. 


न्यूझीलंडने टॉस जिंकला आणि भारताला फलंदाजीस बोलावले. भारताने ८ षटकांत ५ गडी गमावताना ६७ धावा केल्या. भारताकडून एकाही फलंदाजांला चांगला कामगिरी करता आली नाही.