डर्बी : कर्णधार मिताली राजचे दमदार शतक आणि वेदा कृष्णमूर्ती-हरमनप्रीत कौर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ५० षटकांत ७ बाद २६५ धावा केल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मितालीने १२३ चेंडूत ११ चौकारांसह १०९ धावा तडकावल्या. तिला कौरा आणि वेदाने चांगली साथ दिली. 


२१ धावांता भारताचे दोन गडी बाद झाले असताना मिताली आणि कौर यांनी खेळपट्टीवर टिकून राहत तिसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची पार्टनरशिप केली. कौरने ९० चेंडूत ६० धावा केल्या. 


कौर बाद झाल्यानंतर मितालीने वेदासह धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. पाचव्या विकेटसाठी वेदा आणि राजने १०८ धावांची भागीदारी केली. यामुळेच भारताला अडीचशे धावा पार करता आल्या.