नवी दिल्ली : पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे की, 'चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये भारताविरोधात होणारा सामना विशेष आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचं पारडं जड आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिदीने आयसीसीसाठी लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटलं आहे की, पाकिस्तानी समर्थक म्हणून मला वाटतं की माझा संघ कोणत्याही संघासमोर जिंकावा. खास करुन भारत विरोधात. पम इतिहास आणि भारतीय टीमची खोली यामुळे या सामन्यात भारताचं पारडं जड आहे.'


आफ्रिदीने म्हटलं की, पाकिस्तानी गोलंदाजांना भारत मजबूत बॅट्समन विकोधात चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे. कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची बॅटींग लाईन अप खूप मजबूत आहे. जी कोणत्याही दिवशी कोणत्याही बॉलरला धुवू शकता.'