नवी दिल्ली : अलिकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेले टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.  त्यांनी आपल्या  लग्न सोहळ्यानंतर स्वागत समारंभ आयोजित केलाय. त्याचे निमंत्रण त्यांनी मोदींना दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीत पार पडलेल्या विरूष्काच्या शानदार लग्न सोहळ्यानंतर राजधानी दिल्लीत शानदार स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलाय. या लग्न सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित करण्यात आलंय. त्यासाठी विरुष्कानं पंतप्रधान मोदींची भेट घेऊन, त्यांचा आशीर्वादही घेतला. तसंच यावेळी पंतप्रधानांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या.