नवी दिल्ली : विराट आणि अनुष्का यांनी इटलीत जाऊन केलेल्या लग्नाविषयी जगभरात चर्चा होच आहे. या सिक्रेट लग्नातील प्रत्येक गोष्ट सर्वांना जाणून घ्यायची आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांचे लग्न लावणारे भटजी सेलिब्रेटी बनले आहेत. यांच्याविषयीही लोक इंटरनेटवर सर्च करत आहेत.


सोशल मीडियावर या भटजींनाही शुभेच्छा दिल्या जात आहेत. 


४०० कि.मीचा प्रवास 


इटलीत राहणारे पंजाबचे पंडितजी पवन कुमार कौशल २५ वर्षांपूर्वी इटलीतील बोर्गो सेन जियकमो शहरात वास्तव्यास गेले.


लग्नाच्या काही वेळ आधीपर्यंत त्यांना माहित नव्हते की विराट आणि अनुष्काचे लग्न आपण लावणार आहोत.


मला वेन्यू पर्यंत पोहोचण्यासाठी ४०० कि.मी.चा प्रवास करावा लागला.


सात फेऱ्यांची सात वचन


विराट आणि अनुष्का खूप आदराने माझ्याशी बोलत होते.लग्नातील विधींमध्ये ते रुचि दाखवत होते. सात फेऱ्यांमधील प्रत्येक फेऱ्याचे वचन मी त्यांना समजावून सांगितल्याचे पवन यांनी सांगितले. 


'इतर पंडित जळतात'


एवढ्या मोठ्या लग्नाला भटजी म्हणून माझी निवड झाल्यानंतर इटलीतील दूसरे भारतीय पंडित माझ्यावर जळतायत. पवन हे शनिदेवाचे पुजारी आहे आणि इटलीमध्ये त्यांचे शिव मंदिर आहे.