कोलंबो : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारतानं धावांचा डोंगर उभारला आहे. ५० ओव्हरमध्ये भारतानं ५ विकेटच्या मोबदल्यात ३७५ धावा केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. ओपनर शिखर धवन फक्त ६ रन्स करून माघारी परतला. पण त्यानंतर विराट कोहलीनं ९६ बॉल्समध्ये १३१ धावा केल्या तर रोहित शर्मानं ८८ बॉल्समध्ये १०४ धावा केल्या. विराटच्या खेळीमध्ये १७ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता आणि रोहितनं ११ फोर आणि ३ सिक्स मारले.


विराट आणि रोहित आऊट झाल्यानंतर मनिष पांडे आणि धोनीनंही चांगली खेळी करून भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेलं, मनिष पांडेनं ४२ बॉल्समध्ये नाबाद ५० धावा केल्या तर धोनीनं ४२ बॉल्समध्ये नाबाद ४९ धावा केल्या.


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा


विराट कोहलीचं हे वनडेमधलं २९वं शतक होतं तर रोहितचं १३वं शतक होतं. रोहितची हे लागोपाठ दुसरं शतक आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडेमध्ये सचिनची ४९, पॉटिंगची ३० शतकं आहेत. श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या २८ शतकांचा रेकॉर्ड विराटनं मोडला आहे. सचिन तेंडुलकरनं ४५२ इनिंग्समध्ये ४९, रिकी पॉटिंगनं ३६५ इनिंगमध्ये ३० तर विराटनं फक्त १८५ इनिंगमध्येच २९ शतकं पूर्ण केली आहेत.