कोलंबो :  भारताने आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेसमोर ३७६ धावांचे लक्ष्य ठेवले. पण आज प्रेमदासा स्टेडिअमवर एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं.  कर्णधार विराट कोहली बाद झाल्यावर रोहित शर्माने मलिंगाला मिठी मारली आणि अभिनंदन केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचं कारण तुम्हांला समजल्यावर तुम्हांलाही रोहित बरोबर आहे असे वाटेल.  झालं असं की, भारत आणि श्रीलंकतील हा सामना लसिथ मलिंगासाठी खूप खास ठरला. श्रीलंकेच्या गोलंदाजाने वन डेमध्ये ३०० विकेट पूर्ण केलेत. हे खास यासाठी की या सामन्यात मलिंगा स्वतः कर्णधार झाला आहे. तसेच त्याचा ३०० वा शिकार भारताचा कर्णधार विराट कोहली बनला. 


मलिंगाने विराटला बाद केल्यावर रोहित शर्मा याने त्याचे अभिनंदन केले. त्यावेळी त्याने मलिंगाला मिठी मारली. हे दृश्य पाहिल्यावर भारतीय प्रेक्षक हैराण झाले की हे काय झाले. पण जेव्हा समजले की मलिंगाने ३०० विकेट घेतल्या त्यानंतर प्रेक्षकांचे कोडे सुटले.   त्यानंतर क्रिजवर आलेल्या हार्दिक पांड्यानेही मलिंगाचे अभिनंदन केले. 


 




आयपीएलमध्ये एकाच संघात


मलिंगा, रोहीत आणि पांड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स या संघात खेळत असल्याने त्यांनी आपल्या आयपीएलच्या संघातील सहकाऱ्याच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन केले.