लेसिस्टर : महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाची विजयी घोडदौड द. आफ्रिकेने शनिवारी रोखली. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला दारुण पराभवास सामोरे जावे लागले. भारताला या सामन्यात ११५ धावांनी पराभव पत्करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने नाणेफेक जिंकताना प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आफ्रिकेने ५० षटकांत २७३ धावा तडकावल्या. प्रत्युत्तरादाखल भारताला १५८ धावाच करता आल्या. दीप्ती शर्मा(६०) आणि झुलन गोस्वामी(नाबाद ४३) यांनी द. आफ्रिकेविरुद्ध थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने भारताच्या पदरी पराभव पडला.


भारताने यापूर्वीचे सारे सामने जिंकले होते. मात्र भारताचा हा विजयरथ द. आफ्रिकेने रोखला. मिताली राजला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही.