मुंबई : इंग्लंड विरुद्ध इंडिज सामन्यामध्ये इंडिजचा सात विकेटने पराभव झाला आहे. यामुळे श्रीलंकेचा वर्ल्डकपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विजयामुळे श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.


इंडिजच्या पराभवामुळे श्रीलंकेच्या टीमला २०१९ च्या वर्ल्डकपमध्ये सरळ प्रवेश मिळाला आहे. दुसरीकडे दोन वेळा वर्ल्ड चॅम्पिअन असलेल्या इंडिजच्या टीमला आता क्वॉलिफाय करुन यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. आयसीसीने घोषणा केली होती की, इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर इंडिजचे ७८ गुण झाले होते. तर श्रीलंकेने ८६ गुणांसह वर्ल्डकपमध्ये सरळ प्रवेश केला आहे.