नवी दिल्ली : जेएनयूमधल्या हिंसाचारावर वेगवेगळ्या सेलिब्रिटी व्यक्त होताना दिसत आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनीही याबाबत त्यांचं मत व्यक्त केलं आहे. आमचे काही तरुण वर्गात असण्यापेक्षा रस्त्यावर आहेत, त्यामुळे देशात बेचैनी आहे, असं गावसकर म्हणाले. दिल्लीतल्या एका कार्यक्रमात गावसकर आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देशामध्ये बेचैनी आहे. काही युवा वर्गात असण्याऐवजी रस्त्यावर आहे. रस्त्यावर असलेले काही जण रुग्णालयात आहेत. पण बरेच जण वर्गात आहेत आणि देशाला पुढे नेण्यासाठी आपली कारकिर्द घडवण्यासाठी इच्छुक आहेत. आपण जेव्हा एकत्र असू, आपल्यातला प्रत्येकजण पहिले भारतीय असेल, तेव्हाच एक देश म्हणून आपण पुढे जाऊ शकू. आपण जेव्हा एकत्र असू तेव्हाच जिंकू, असं खेळ आपल्याला शिकवतो. देश याआधीही संकटातून बाहेर आला आहे आणि यावेळीही येईल,' असं वक्तव्य गावसकर यांनी केलं.