कोलंबो : २३१ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियानं श्रीलंकेसमोर लोटांगण घातलं आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मानं चांगली सुरुवात दिल्यानंतर २२ रन्समध्ये टीम इंडियाच्या सात विकेट्स पडल्या. रोहित शर्मानं ५४ आणि शिखर धवननं ४९ रन्स करून भारताला १०९ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली पण नंतरच्या बॅट्समनना फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. श्रीलंकेच्या धनंजयानं सहा तर सिरीवर्धनानं एक विकेट घेतली.


त्याआधी टीम इंडियानं टॉस जिंकून श्रीलंकेला पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि श्रीलंकेला २३६ रन्सवर रोखलं. जसप्रीत बुमराहनं ४, चहालनं २ आणि हार्दिक पांड्या, अक्सर पटेलनं प्रत्येकी एक विकेट घेतली. 


लाईव्ह स्कोअरबोर्ड पाहण्यासाठी क्लिक करा