Sunil Gavaskar on Paris Olympics 2024 : भारतीय क्रिकेटचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण (Prakash Padukone) यांचं समर्थन केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) ब्राँझ मेडलच्या सामन्यात बॅडमिंटन खेळाडू लक्ष्य सेनच्या पराभवानंतर प्रकाश पादुकोण यांनी खेळाडूंना जबाबदार धरलं होतं. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना दबाव सहन करायला शिकलं पाहिजे असं म्हटलं होतं. प्रकाश पादुकोण यांच्या वक्तव्याचे पडसाद भारतीय क्रीडा क्षेत्रात उमटले. अनेक खेळाडूंनी प्रकाश पादुकोण यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील गावसकर यांचं समर्थन
प्रकाश पादकुोण यांच्या वक्तव्यावर बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पाने टीका केली होती. पण आता महान क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी प्रकाश पादुकोण यांना पाठिंबा दर्शवला आहे. 'आपल्या देशाने बहाणे बनवण्याची कला पारंगत केली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला एकही सुवर्ण मिळाले नाही. टीम इंडियाला 1 रौप्य आणि 5 कांस्यपदकावर समाधान मानावे लागले' असं गावसकर यांनी म्हटलंय. 


सुनील गावसकर यांनी स्पोर्टस्टारमध्ये लिहिलेल्या कॉलममध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर संताप व्यक्त केलाय. प्रकाश पादुकोण हे शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जाता. ते नेहमी प्रकाशझोतापासून दूर राहतात. पण पॅरिस ऑलिम्पिकमधली खेळाडूची कामगिरी त्यांनाही स्वस्त बसू देत नाही, त्यांचं वक्तव्य खेळाप्रती त्यांच्या असलेल्या प्रेमातून आल्याचं गावसकर यांनी म्हटलंय. 


गावसकरांनी सुनावलं
प्रकाश पादुकोण यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी या माजी वर्ल्ड चॅम्पियनची बाजू घेतली नाही. बहाणे बनवण्यात आपला देश प्रत्येक वेळी गोल्ड मेडल जिंकतो. खेळाडूंना असोसिएशन आणि सरकारकडून अनेक सुविधा आणि प्रत्येक गोष्टी मदत मिळते. त्यामुळे कामगिरी सुधारण्याची जबाबदारी ही खेळाडूंची आहे. त्यामुळे प्रकाश पादुकोण यांची खंत योग्य असल्याचं गावसकर यांनी म्हटलंय. 


खेळाडू आपल्या कामगिरीची जबाबादीर घेणार नाहीत तर कोण घेणार? काही जण म्हणतात की वेळ खराब होती, पण असं कधी पर्यंत म्हणत राहाणार? खेळाडूंवर सार्वजनिकरित्या केलेल्या टीकेचा प्रभाव पडतो, इतर कोणत्या गोष्टींचा नाही असंही गावसकर यांनी म्हटलं आहे. 


पॅरिस ऑलिम्पिक 
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने पाच कांस्य पदकं आणि एक रौप्य पदक पटकावलं. भालाफेकीत नीरज चोप्राचं सुवर्ण पदक थोडक्यात हुकलं. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. तर नेमबाजीत मनु भाकेरने दोन कांस्य पदकं पटकावली. याशिवाय सरबज्योत सिंगला एक कांस्य पदक मिळालं.   महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे आणि कुस्तीत अमन सेहरावतने कांस्य पदकाची कमाई केली.