राजकोट :  राजकोटच्या मैदानावर भारतीय संघ आज न्यूझीलंडशी भिडणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा टी-२० सामना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ किवी संघाला नमवण्यासाठी सज्ज झालाय. टी-२०मध्ये न्यूझीलंडने नेहमीच भारतावर वर्चस्व गाजवले. मात्र पहिल्या टी-२० सामन्यात मात्र कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कमाल केली.


आतापर्यंत टी-२०मध्ये भारताला एकदाही न्यूझीलंडविरुद्ध जिंकता आले नव्हते. मात्र एक नोव्हेंबरला झालेल्या सामन्याने मात्र हे बदलले. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय मिळवला. 


आजचा सामनाही जिंकल्यास न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय कर्णधार ठरणार आहे.