उद्या भारत-पाकिस्तान सेमीफायनल रंगणार, पाहा किती वाजता सुरु होणार मॅच
अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.
ख्राईस्टचर्च : अंडर १९ वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात बुधवारी सेमीफायनलचा सामना रंगणार आहे.
भारत सातव्यांदा सेमीफायनलमध्ये पोहोचलाय. यातील 5 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवता आला तर एका सामन्यात पराभव सहन करावा लागला.
सर्वाधिक वेळा सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ
1. पाकिस्तान - 8 (विजय 5, पराभव 2)
2. ऑस्ट्रेलिया - 8 (विजय 4, पराभव 3)
3. भारत - 7 (विजय 5, पराभव 1)
क्वार्टरफायनलमध्ये भारताने बांगलादेशला तब्बल 131 धावांनी हरवले आणि सेमीफायनल गाठली. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करतोय.
भारताचा सेमीफायनलपर्यंतचा प्रवास
भारताने स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला हरवले. त्यानंतर पापुआ न्यू गिनी आणि झिम्बाब्वे या दोन दुबळ्या संघांना सहज हरवले. त्यानंतर आता बांगलादेशला हरवत भारताने सेमीफायनल गाठलीये.
सामन्याची वेळ : मध्यरात्री ३ वाजता.