पॉटचेफस्टरूम : अंडर-१९ वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारताच्या बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानचा १७२ रनवर ऑलआऊट झाला आहे. भारताकडून सुशांत मिश्राने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर कार्तिक त्यागी आणि रवी बिष्णोईला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. अर्थव अंकोलेकर आणि यशस्वी जयस्वालला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं. पाकिस्तानकडून ओपनर हैदर अलीने ५६ रन तर कर्णधार रोहेल नाझिरने सर्वाधिक ६२ रनची खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण २३ मॅच झाल्या आहेत, यातल्या १४ मॅचमध्ये भारताचा आणि ८ मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला आहे, तर १ मॅच टाय झाली आहे. 


अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ९ सामने झाले आहेत, यातल्या ४ मॅचमध्ये भारताचा विजय तर ५ मॅचमध्ये पराभव झाला आहे. पण मागच्या ३ वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची मॅच २३ जानेवारी २०१० साली झाली होती.


भारत-पाकिस्तान सामन्यांचा इतिहास


अंडर19 वर्ल्‍डकप 1988:  पाकिस्‍तानने 68 रनने सामना जिंकला


अंडर19 वर्ल्‍डकप 1998:  भारताने 5 विकेटने सामना जिंकला


अंडर19 वर्ल्‍डकप 2002:  पाकिस्‍तानने 2 विकेटने सामना जिंकला


अंडर19 वर्ल्‍डकप 2004 : पाकिस्‍तानने 5 विकेटने सामना जिंकला


अंडर19 वर्ल्‍डकप 2006:  पाकिस्‍तानने 38 रन सामना जिंकला


अंडर19 वर्ल्‍डकप 2010:  पाकिस्‍तानने 2 विकेटने सामना जिंकला


अंडर19 वर्ल्‍डकप 2012 : भारताने एक विकेटने सामना जिंकला


अंडर19 वर्ल्‍डकप 2014:  भारताने 40  रन सामना जिंकला


अंडर19 वर्ल्‍डकप 2018 : भारताने 203 रनने मोठा विजय मिळवला