मुंबई : कॅप्टन विराट कोहलीच्या अनुपस्थितीतही रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जबरदस्त परफॉर्मन्स देत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या तूफान शतकाच्या जोरावर  श्रीलंकेविरूद्धची दुसरी टी २०  मॅच टीम इंडियाने खिशात टाकली. 


रोहितचे इशारे



१३ व्या ओव्हरमध्ये ११८ रन्स बनवून रोहित शर्मा आऊट झाला. रोहित पव्हेलियनच्या दिशेने जात असताना 'तिसऱ्या नंबरवर कोण खेळणार ?' असा प्रश्न कोच रवी शास्त्री यांनी विचारला.


त्यावर दुसऱ्या क्षणालाच रोहितने खूणावले आणि महेंद्रसिंग धोनीला पाठविण्यास सांगितले. 


धोनी क्रिजवर


त्यानंतर धोनी क्रिजवर आला आणि आपल्या अंदाजात २१ बॉल्समध्ये २८ रन्सची खेळी केली. त्यामध्ये २ चौके आणि २ सिक्सरचा समावेश होता. 


मॅच संपल्यानंतर आता कोच रवी शास्त्री आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्यातील इशाऱ्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच रोहितच्या या इशाऱ्याचेही कौतूक  होत आहे.