मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीमधील टस्कनीमध्ये विवाहबंधनात अडकले.


४ वर्षांपासून करत होते डेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोर्गो फिनोशिटो रिसोर्टमध्ये दोघांनी सात फेरे घेतले. दोघेही ४ वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. दोघांच्या संबंधामध्ये अनेकदा चढउतार पाहायला मिळाला.


या अभिनेत्याने केलं पॅचअप


एक वेळ अशी देखील होती जेव्हा दोघांचा ब्रेकअप होणार होता. पण सलमान खानने असं नाही होऊ दिलं. दोघांच्या संबंधामध्ये थोडा वाद सुरु झाल्याने विराट लवकर लग्न करु इच्छित होता. पण अनुष्का यासाठी तयार नव्हती. ती तिच्या करिअरसाठी वेळ देऊ इच्छित होती. ही ती वेळ होती जेव्हा सुलतान सिनेमाचं शुटींग सुरु होतं.


असं झालं पॅचअप


विराटची त्यावेळेस इच्छा नव्हती की, अनुष्काने कोणताही सिनेमा साईन करावा. पण अशा चर्चा सुरु असतांनाच दोघे एकत्र मुंबईमध्ये डिनर करतांना दिसले होते. एका रिपोर्टनुसार डिनरनंतर अनुष्का विराटला सोबत घेऊन सलमान खानच्या घरी गेली. असं म्हटलं जातं की सलमान खानने त्या वेळेस दोघांचं पॅचअप केलं होतं.


म्हणून विराट अनुष्कावर रागावला


२०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी विराटने श्रीलंका दौऱ्यासाठी सुट्टी घेतली होती. विराटने अनुष्कासोबत एका अनोळखी ठिकाणी जाण्याचा प्लॅन बनवला होता. त्यावेळेस अनुष्का 'सुल्तान'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्यामुळे अनुष्काने विराटला नकार दिला. यानंतर विराट अनुष्कावर रागावला होता.