मुंबई : आयपीएलमध्ये मुंबई आणि बंगळूरु यांच्यात रंगलेल्या सामन्यात विराटच्या संघाने बाजी मारली. दोन्ही संघासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. मात्र विराटच्या संघाने चांगली कामगिरी करताना हा सामना जिंकला आणि प्ले ऑफमध्ये जाण्याचा मार्ग थोडा सुखकर केला. तर दुसरीकडे मुंबईसाठी मात्र प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झालाय. सामना बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. विराटच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी अनुष्काही आली होती. जिंकल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये विराट असं काही बोलला की दूर उभी असलेली अनुष्का अक्षरश: लाजली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये विराट कोहलीला बोलवण्यात आले. विराट म्हणाला, हा विजय माझ्यासाठी महत्त्वाचा होता. विशेष करुन स्पर्धेच्या या स्टेजला. आम्ही ड्रेसिंग रुममध्ये ठरवले होते की कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा सामना जिंकणार. आम्ही गोलंदाजांना खुलेपणाने गोलंदाजी करण्यास सांगितले होते. उमेश,चहलने चांगली गोलंदाजी केली. 



यानंतर विराट पुढे म्हणाला, माझी बायको अनुष्का येथे आहे आणि आज तिचा बर्थडे आहे. मी खूप खूश आहे की ती येथे असताना मी जिंकलोय. हे म्हणताच अनुष्का लाजत हसू लागली. 


गेल्यावर्षी विराट आणि अनुष्का इटलीमध्ये विवाहबद्ध झाले. त्याचा हा विवाहसोहळा काही मोजक्या पाहुण्यामंडळीच्या उपस्थितीत पार पडला होता. सध्या हे कपल सर्वाधिक चर्चिले जाणारे कपल आहे.