दुबई : रविवारी दुबईच्या क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तान युद्ध रंगलं होतं. या सामन्यामध्ये भारताने बाजी मारली आणि टी-20 सामन्यात झालेल्या ऐतिहासिक पराभवाचा वचपा काढला. टीम इंडियाने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात प्रेक्षकांना माजी कर्णधार विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र यावेळीही विराट फेल ठरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या सामन्यादरम्यान विराट कोहली चर्चेत होता. यावेळी तो त्याच्या खेळीसाठी नव्हे तर विचित्र कृत्यामुळे चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान यावेळी विराट कोहलीचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 


विराटने नेमकं काय केलं?


भारताची फलंदाजी सुरु असताना विराट 35 रन्सवर पव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान यानंतर पुढील खेळ सुरु असताना कॅमेरामॅनने विराटकडे कॅमेरा नेला. यावेळी विराट नाकाशी हातचाळे करताना दिसला. हा किळसवाणा प्रकार पाहून लोकांनी त्याला ट्रोल केलं आहे.



भारताचा विजय


या सामन्यात अखेर टी-20 आशिया कपच्या या रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 5 विकेटने पराभव केला. पाकिस्तानने भारताला 148 रन्सचं लक्ष्य दिलं होतं, जे भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकलं. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने शेवटी सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला