नवी दिल्ली : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानच्या 'सीक्रेट सुपरस्टार' सिनेमाच्या प्रमोशनसाठी एका चॅट शोचं आयोजन करण्यात आलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चॅट शोमध्ये सहभागी होण्यासाठी टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली दाखल झाला होता. या चॅट शोमध्ये विराट आणि आमिर खान यांच्यात खूप गप्पा झाल्या. गप्पा-गप्पांमध्ये विराटने अनुष्का संदर्भात आपल्या भावनाही व्यक्त केल्या.


या चॅट शो दरम्यान अभिनेता आमिर खानने विराट कोहलीला अनेक प्रश्न विचारले. यामध्ये अनुष्का शर्माच्या चांगल्या आणि वाईट सवयीही विराटला विचारल्या. यावर उत्तर देताना विराटने म्हटलं की, अनुष्काची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिचा स्वभाव खूपच केअरिंग आहे. तर वाईट सवय म्हणजे ती नेहमी ५-७ मिनिटं उशिराने येते.


यासोबतच विराटला आवडत्या सिनेमांसंदर्भात विचारण्यात आलं. विराटने सांगितले की, आमिर खानचा 'जो जिता वही सिकंदर', '३ इडियट्स' आणि 'पीके' हे सिनेमे खूप आवडले. यावर आमिर खानने म्हटलं की, पीके सिनेमा आवडणारच कारण, त्यामध्ये अनुष्का मुख्य भूमिकेत जी आहे.


यासोबतच २०११ वर्ल्ड कप फायनल मॅच संदर्भात बोलताना विराटने म्हटलं की, मला भीती वाटत होती की मलिंग यॉर्कर टाकेल. पण २-३ बॉल्सनंतर मी सेट झालो. याच मॅचमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करत २८ वर्षांनी वर्ल्ड कप जिंकला होता.