मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाह बंधनात अडकले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इटलीमध्ये हा लग्न सोहळा सुरु आहे. टस्कनीमधील बोर्दो फिनोशोतो रिसॉर्टमध्ये हा विवाह झाला. विवाहानंतर विराट आणि अनुष्काला विवाहाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.


विराटने गायलं गाणं


१५ डिसेंबरपर्यंत हा सोहळा चालणार आहे असं म्हटलं जातंय. विराटने संगिताच्या कार्यक्रमात अनुष्कासाठी एक खास गाणं गायलं आहे. मेरे मेहबूब हे गाणं विराटने अनुष्काला डेडीकेट केलं आहे.



पंजाबी पद्धतीने विवाह


विरुष्काच्या शाहीविवाह सोहळ्याचा विधी सुरु झाला असून १५ डिसेंबर पर्यंत हा लग्नसोहळा रंगणार आहे. विराट आणि अनुष्काचा विवाह हा पंजाबी पंद्धतीने झाला. विराट आणि अनुष्का दोन्ही ही पंजाबी आहेत.