मुंबई : २००१ मध्ये स्टीव वॉ केच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया टीम खेळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यासाठी अनेक संघ आजही घाबरतात. भारतीय संघ येण्याअगोदर ऑस्ट्रेलियाने एका रांगेत १५ टेस्ट मॅच जिंकल्या आहेत. कोणत्याही संघाला कोणत्याही संघाला एकही मॅच ड्रॉ करण्याची संधी दिली नाही. भारत आल्यानंतर पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडिया आल्यानंतर सहज हरवलं. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया टीम १६ टेस्ट जिंकल्या आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये देखील त्यांनी विजय मिळवला होता. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये ४४५चा स्कोर केला होता. 


टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर निभाव लागला? 



टीम इंडियाची पहिली इनिंग सुरू होताच संपली. संपूर्ण संघाने ५८.१ ओव्हरमध्ये १७१ धावा केल्या. पहिल्या इनिंगमध्ये सहाव्या नंबरवर फलंदाजी करण्यास उतरलेल्या लक्ष्मणने ५९ धावा केल्या. टीम इंडियाला फॉलोऑन खेळाव लागलं. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या २ विकेट अगदी लगेच पडल्या. 


गांगुलीने घेतला महत्वाचा निर्णय 


कॅप्टन गांगुलीला समजल होतं की मॅच फक्त लक्ष्मण वाचवू शकतो. त्याने तिसऱ्या नंबरवर लक्ष्मणला फलंदाजी करायला पाठवलं. मॅचच्या चौथ्या दिवशी १४ मार्च २००१ वीवीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड असे फलंदाजी केली की ज्याने इतिहास रचला. या दोघांनी फलंदाजी करून ३३५ धावा केल्या. टेस्टमध्ये तोपर्यंत २३६ स्कोर करून सुनील गावसकर हा नाव पुढे होतं. मात्र आता लक्ष्मण त्यापुढे गेला होता.