नवी दिल्ली :  टेनिसमध्ये मिक्स डबलप्रमाणे क्रिकेटमध्ये मिक्स्ड टीम असायला हवी असे मत अभिनेता खिलाडी अक्षय कुमार याने म्हटले आहे. विम्बल्डन पाहत होता त्या ठिकाणी मिक्स्ड डबल पाहत होतो. त्यातून ही आयडीया आल्याचे अक्षयने म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेनिसमध्ये एका देशातील पुरूष आणि महिला दुसऱ्या देशातील पुरूष आणि महिलेशी खेळतात. तसा प्रयोग क्रिकेटमध्येही करायला हवा. किती मजा येईल की आपल्या देशातील सहा पुरूष खेळाडू आणि सहा महिला दुसऱ्या देशातील सहा पुरूष आणि सहा महिलांशी खेळताहेत. हे पाहणे शानदार असते. विराट आणि मिथाली एकत्र खेळताहेत हे पाहणे खूप मजेशीर असणार आहे, असे अक्षय याने सांगितले. 


 



झी न्यूजच्या एका कार्यक्रमात भारतीय विश्व कप संघातील १० खेळाडूची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी अक्षय कुमारला फोन लावण्यात आला. त्यावेळी त्याने ही आयडीया व्यक्त केली.