मुंबई : वेस्टइंडीज विरूद्धचा पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनचं शतक हुकलं आहे. अवघ्या तीन धावा बाकी असताना तो बाद झाला आहे. धवनच्या 97 धावांच्या खेळीने  टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारता येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टइंडिजने पहिल्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन निकोलस पूरनने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडीया प्रथम फलंदाजीला उतरली होती. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. शिखर धवन आणि शुभमन गिलने भारताच्या डावाला चांगली सुरूवात करून दिली होती. 


शुभमन गिलने 53 बॉलमध्ये 64 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. त्याच्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे. शिखर धवनचं शतक हुकलं आहे.  धवनने 99 बॉलमध्ये 97 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार लगावले आहेत.   


दरम्यान आता टीम इंडिया आता वेस्टइंडिज समोर किती धावांच आव्हान ठेवतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.