बर्मिंघम : बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाची बॅटिंग चांगल्या सुरुवातीनंतर पुन्हा गडगडली आहे. या मॅचमध्ये बांगलादेशला विजयासाठी ३१५ रनचं आव्हान आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ३१४/९ एवढा स्कोअर केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोन्ही ओपनरनी टीम इंडियाला २९ ओव्हरमध्ये १८० रनपर्यंत पोहोचवलं. रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीतलं २६वं तर या वर्ल्ड कपमधलं चौथं शतक झळकावलं. ९२ बॉलमध्ये १०४ रन करून रोहित आऊट झाला, तर केएल राहुलने ७७ रनची खेळी केली.


रोहित आणि राहुलची विकेट गेल्यानंतर मात्र भारताची बॅटिंग गडगडली. ऋषभ पंतने ४१ बॉलमध्ये ४८ रन केले, तर धोनीने ३३ बॉलमध्ये ३५ रनची खेळी केली. मागच्या लागोपाठ ५ मॅचमध्ये अर्धशतक करणाऱ्या विराट कोहलीला या मॅचमध्ये २६ रन करता आले. तर हार्दिक पांड्या शून्य रनवर आऊट झाला. केदार जाधवच्याऐवजी संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकला ८ रन करता आले. 


बांगलादेशकडून मुस्तफिझुर रहमानने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या. शाकीब अल हसन, रुबेल हुसेन आणि सौम्य सरकारला प्रत्येकी १ विकेट मिळाली. 


या मॅचमध्ये विजय मिळवल्यास टीम इंडिया सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. दुसरीकडे सेमी फायनलच्या प्रवेशाचं आव्हान कायम ठेवण्यासाठी बांगलादेशला हा सामना जिंकावाच लागणार आहे.