साऊथम्पटन : २०१९च्या क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतला टीम इंडियाचा पहिला सामना बुधवार ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. त्याआधी कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. हा वर्ल्ड कप माझ्या कारकिर्दीतली सगळ्यात मोठी परीक्षा आहे, असं विराट कोहली म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमने निराशाजनक कामगिरी केली आहे. याआधी इंग्लंड आणि बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण 'कोणत्याच टीमला आम्ही कमजोर समजत नाही. त्यांच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेची टीम धोकादायक असते. आम्हाला आमच्या ताकदीने खेळावं लागेल,' असं वक्तव्य विराटने केलं.


कुलदीप यादवचा फिटनेस आणि फॉर्मवरही कोहलीने भाष्य केलं. 'कुलदीप नेटमध्ये चांगली बॉलिंग करतोय. कुलदीप यादवने टाकलेला प्रत्येक बॉल स्टम्पला लागतोय. केदार जाधव टीमला योग्य संतुलन देतो,' असं विराटने सांगितलं.