नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. जिओची फ्री ऑफर संपल्यानंतरही ग्राहकांना काळजी करण्याची गरज नाही. असं बोललं जातंय की, जिओची फ्री ऑफर संपल्यानंतरही फ्री ४जी डेटा मिळत राहणार आहे. जिओ युजर्सला एप्रिलपासून फोनवर मिळणारी ऑफऱ संपली आहे तर काही लोकांची संपणार आहे. ज्यांची ऑफर संपली त्यांनी धन धना धन ऑफर घेतली. यामध्ये ३ महिने फ्री सेवा होती. दुसरीकडे समर सरप्राईज ऑफर देखील युजर्ससाठी लॉन्च केली गेली होती. त्यांना सध्या काळजी करण्याची चिंता नाही. कारण तुमच्या नंबरवर ऑफर जरी संपली असेल तरी फ्री सर्विस सुरुच राहणार आहे.
 
जिओने मार्चमध्ये समर सरप्राईज ऑफर आणली होती. या प्लॅननुसार ग्राहकांना 303 रुपये आणि प्राइम मेंर्बेर्शिपसाठी 99 रुपयांचं रिचार्ज करावं लागलं होतं. या ऑफरनुसार युजरला तीन महिने (एप्रिल ते जून) फ्री सेवा मिळणार होती. आता समर सरप्राईज ऑफर संपताच 303 रुपयांचा प्लॅन एक्टिव झाला.


तरीही अनेकांना शंका असतील की त्यांच्या नंबरवर समर सरप्राईज ऑफर अॅक्टिव्ह आहे की धन धना धन. युजर्सला जर हे माहिती करुन घ्यायचं असंल तर त्यांना MyJio अॅपची मदत घ्यावी लागेल.