COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : high-speed 5G internet : इंटरनेटमध्ये क्रांती घडून आल्यानंतर आता सुपरफास्ट 5G सेवा लॉन्च होत आहे. मात्र, ही सेवा कधी सुरु होणार याची उत्सुकता शिगेला होती. 5G सेवा कधी सुरु होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते, आता याबाबत केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले आहे.


देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. 5G सेवा सुरू झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्याटप्याने विस्तार करण्यात येणार आहे. पुढील दोन ते तीन वर्षांत देशभरात 5G सेवा पोहचण्याचे आमचं ध्येय आहे. 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल, याचीही खात्री करु, त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे लक्ष देत असल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. 


हाय-स्पीड 5G सेवा दोन-तीन वर्षांत देशातील बहुतेक भागांमध्ये उपलब्ध होईल आणि 12 ऑक्टोबरपर्यंत मोठ्या मंडळांमध्ये नेटवर्कचे स्थिर रोलआउट अपेक्षित आहे. यापूर्वी, सरकारने म्हटले होते 29 सप्टेंबरपर्यंत देशात 5G कनेक्टिव्हिटी सुरू होईल. दुसरीकडे एअरटेलने या महिन्यात त्यांची 5G सेवा करण्याचे आश्वासन दिले होते.


DoT ने यापूर्वी जाहीर केले होते की अहमदाबाद, बंगळुरु, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे या 13 प्रमुख भारतीय शहरांमध्ये हाय-स्पीड 5G इंटरनेट सुरु होईल.