नागपूर : आम्ही १५ कोटी १०० कोटींवर भारी पडू या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी वारिस पठाणांवर चौफेर टीका सुरू आहे. वारिस पठाण यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अटकेची मागणी केलीये. तर वारीस पठाणांवर कारवाई होणार आहे. संबंधितांना याबाबत सूचना देण्यात आल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय. पठाण यांच वक्तव्य चुकीचंच असल्याचं मत देशमुख यांनी व्यक्त केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


वादग्रस्त विधान


आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. आम्ही एकत्र आलो तर तुमचं काय होईल, असं वक्तव्य केलं आहे. वारीस पठाण यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं, त्यावेळी एमआयएमचे असदुद्दीन ओवीसी देखील उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे.


वीटेचं उत्तर दगडाने उत्तर देऊ, आता तर वाघीणी बाहेर आल्या आहेत, आम्ही सर्व एकत्र आलो तर काय होईल, आम्ही १५ कोटी असलो, १०० कोटींना आम्ही भारी पडू असं वादग्रस्त वक्तव्य वारीस पठाण यांनी केलं आहे. कर्नाटकातील गुलबर्गामध्ये माजी आमदार वारीस पठाण यांनी हे वक्तव्य केलं आहे.