मुंबई । शहरात आलेले उत्तर भारतीय भाजपमुळे सुरक्षित - फडणवीस

Thu, 24 Jan 2019-11:30 pm,

भाजपचे सरकार आल्यानंतर मुंबईत उत्तर भारतीय लोकांना धमकावणे बंद झाले. धमकावणाऱ्या लोकांना आम्ही त्यांची जागा दाखवली, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते गुरुवारी मुंबईत उत्तर भारतीय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे नाते खूप जुने आहे. मुंबईच्या आजवरच्या विकासात उत्तर भारतीयांचे योगदान महत्त्वाचे आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link