सांगली: भाजप सरकार देशभरात धार्मिक दहशतवाद निर्माण करत आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये भाजप नेत्यांचाच सहभाग आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.  ते रविवारी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान कडेगाव येथे बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी पकडले असले तरी या हत्येमागचे छुपे सूत्रधार हे भाजपचेच नेते असल्याचे विखे-पाटलांनी म्हटले. 


यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. सध्या राज्यात सरकार नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे इंग्रजांप्रमाणे भाजप सरकार विरोधात 'चले जाव'चा नारा द्यावा लागेल, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.