कोल्हापूर : कोल्हापूरात धक्कादायक घटना समोर आली आहे.  मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरात पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.  शाहूवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खून व खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्यटनासाठी प्रसिद्ध आंबा या मुख्य गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोली धरण परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. जलाशय परिसरात पत्र्याच्या पेटीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मृत महिलेचे वय अंदाजे 30 ते 32 वर्षे असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


सात ते आठ दिवसांपूर्वी गळा आवळून महिलेचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संशयितांने महिलेचा मृतदेह पत्र्याच्या पेटीत घालून टाकला असावा असेही पोलिसांनी म्हटलं आहे. 


बेपत्ता असणाऱ्या महिलेच्या नातेवाईकांनी तसेच घटनेची माहिती असणाऱ्या नागरिकांनी शाहूवाडी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.