मुंबई :  NASA News : सूर्याच्या सर्वात जवळ जाऊनही नासाचे अंतराळ यान (Spacecraft) का जळले नाही, असे तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचे कारण जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी वाचा. नासाच्या अंतराळयानाने प्रथमच सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राला स्पर्श केला आहे, ज्याचे तापमान 1 दशलक्ष ते 2 दशलक्ष अंश सेल्सिअस पर्यंत आहे. जरी पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सुमारे 14 कोटी 32 लाख किलोमीटर किलोमीटर आहे, परंतु भारतीय संस्कृतीत, सूर्य नेहमीच आपल्या खूप जवळ आला आहे.


सूर्याकडे अंतराळयान पाठवण्याचा उद्देश काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेची स्पेस एजन्सी NASA ने 2018 मध्ये ही सौर मोहीम सुरू केली. ज्याचा उद्देश सूर्याचे स्वरूप समजून घेणे आहे. आतापर्यंत कोणत्याही अंतराळ यानाने सूर्याच्या एवढ्या जवळ स्पर्श केलेला नाही, ज्याला चुंबकीय क्षेत्र असेही म्हणतात. खरं तर, आगीच्या ज्वाला सूर्याच्या पृष्ठभागापासून लाखो किलोमीटरपर्यंत पसरतात. सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या ज्वाला त्या क्षेत्रापुरत्या मर्यादित आहेत. त्या प्रदेशाला सूर्याचे चुंबकीय Magnetic Field असेही म्हणतात. येथील तापमान 10 ते 20 लाख सेल्सिअस अंशांपर्यंत असू शकते.


इतिहास घडला, सूर्याला प्रथमच केला स्पर्श !
 
नासाने इतिहास घडवला


या कोरोनाला स्पर्श करण्यात अंतराळयानाला यश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता ही मोहीम 2025 पर्यंत अशीच सुरू राहणार आहे. यादरम्यान हे यान सूर्याभोवती एकूण 24 कक्षेतून जाणार आहे. या मोहिमेमुळे पृथ्वीवरील शास्त्रज्ञांना प्रथमच सौर वाऱ्यांबाबत योग्य माहिती मिळू शकणार आहे.


सूर्याजवळ गेले तरी यान का जळले नाही?


अनेकांना असाही प्रश्न पडेल की सूर्याच्या इतक्या जवळ जाऊनही हे यान का जळले नाही? वास्तविक, या यानाला कार्बन कणांपासून बनवलेले थर्मल शील्ड आहे, जे या वाहनाला जळण्यापासून वाचवते. याशिवाय आतमध्ये एक कूलिंग सिस्टम आहे, जी सतत थंड ठेवते. जरी पृथ्वीपासून सूर्याचे अंतर सुमारे 14 कोटी 32 लाख किलोमीटर आहे. पण करोडो भारतीयांच्या मनापासून सूर्याचे अंतर पाहिल्यास सूर्य आपल्या अगदी जवळ दिसतो.