नवी दिल्ली :  टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या विस्फोटक खेळीने ऑस्ट्रेलियन बॉलर्सची दाणादाण उडवून दिली. या सामन्यात त्याने केवळ ६६ चेंडूत ८३  धावा केल्या. या सामन्यातही त्याने आपल्या चाहत्यांसोबत तसेच इतर क्रिकेट चाहत्यांना खुश केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


त्याने सलग तीन चेंडूंवर तीन षटकार मारले. असे करण्याची त्याची ही पहिली वेळ नव्हती. त्याने तीन वेळा यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात  सलग तीन षटकार ठोकले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला.


पंड्याने पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात याची पुनरावृत्ती केली होती . पण या सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर हार्दिकने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात याची पुनरावृत्ती केली होती.