मुंबई : यंदा घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत ८८.४१ % विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन ट्क्क्यांनी निकाल घटलाय. सालाबादप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक आहे. पण यंदा उत्तीर्ण होणाऱ्या मुले आणि मुलींमध्ये ७ टक्क्यांची तफावत आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक असून नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी आहे.


कोकणची बाजी, नाशिक सर्वात पाठिमागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, यंदाच्या वर्षी कोकण विभागाने जोरदार बाजी मारली असून राज्यात सर्वात प्रथम येण्याचा मान कोकण (९४टक्के) विभागने मिळवला आहे. तर, नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. ९२.३६ टक्के विद्यार्थीनी तर, एकूण ८८.४१ विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले. 


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावी परिक्षेचा निकाल आज (बुधवारी) जाहीर झाला. दुपारी १ वाजलेपासून विद्यार्थ्यां हा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.



विभागनिहाय टक्केवारी-


कोकण - ९४.८५
पुणे - ८९.५८
नागपूर - ८७.५७
औरंगाबाद - ८८.७४
मुंबई - ८७.४४
कोल्हापूर - ९१.००
अमरावती - ८८.०८
नाशिक - ८६.१३
लातूर - ८८.३१


अधिक वाचा - डिअर जिंदगी : अपेक्षा तर त्यांच्याकडूनच आहे, ज्यांना कमी मार्क्स आहेत!


शाखानिहाय निकाल-


विज्ञान - ९५.८५
कला - ७८.९३
वाणिज्य - ८९.५०
व्यवसाय अभ्यासक्रम - ८८.४१