मुंबई : अनिरूद्धवर जीवापाड प्रेम करणारी संजना दीक्षित अखेर सौ. संजना अनिरूद्ध देशमुख झाली आहे. प्रेमात सारं काही शक्य असतं. संजनाने अनिरूद्धला पोलिसांनी धमकी देत का होईना, लग्न केलं आहे. गौरीच्या घरी रजिस्टारला बोलवून अखेर संजनाने अनिरूद्धशी लग्न केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मी अनिरूद्ध देशमुख, संजना दीक्षितचा पत्नी म्हणून स्विकार करतो, असं म्हणतं अनिरूद्धने देखील नाईलाजाने का होईना? पण हे लग्न केलं आहे. लग्नानंतर संजना अनिरूद्धला 'अहो' म्हणून हाक मारते. यानंतर आपण आपल्या घरी जाऊया म्हणत संजना अनिरूद्धकडे 'समृद्धी' बंगल्यात जाण्याचा हट्ट करते. 



अरूंधती आपलं आजारपण बाजूला सारून आई-अप्पांसाठी घरी येते. पण अनिरूद्ध आपल्या मतावर ठाम नसल्यामुळे अरूंधती त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देते. आता पुरे आणखी कुणाला दलदलीत टाकू नका. हे ऐकल्यावर अनिरूद्ध शांत होतो. 



यानंतर संजना आणि अनिरूद्धचं लग्न होतं. माप ओलांडून संजना घरी यायचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात आई कांचनला त्रास होऊ लागतो. या सगळ्यात अनिरूद्ध गळ्यातील वरमाला फेकून देतो. आणि आईकडे धावत जातो. यानंतर घराबाहेर पडलेली अरूंधती पुन्हा घरी येते आणि धावत येत असताना माप ओलांडते. हा सिक्वेन्स नक्की काय सांगणार? हा प्रश्न आता साऱ्यांना पडला आहे.