मुंबई : बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनीस्ट (Mister Perfectinist)  अभिनेता आमिर खान (Aamir Khan) ला आपलं प्रत्येक काम हे परफेक्ट लागतं. याचमुळे त्याला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून संबोधलं जातं. आमिर खानने नुकताच 56 वा वाढदिवस साजरा केला आहे. आपल्या वाढदिवसाच्या अगदी दुसऱ्या दिवशी त्याच्या चाहत्यांना सर्वात मोठा धक्का दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिर खानने सोशल मीडियाला निरोप देण्याचा निर्णय घेतला. जिथे कलाकार चाहत्यांशी थेट संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. तिथे आमिर खानने सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला. आमिर खानने सोशल मीडिया सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. (Breaking: आमिर खानने सोशल मीडियाविषयी हा निर्णय घेण्याचं धाडस अखेर दाखवलं) 


 


'या' कारणामुळे आमिर खानने सोडलं सोशल मीडिया 



या व्हायरल व्हिडिओत आमिर खानने मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. तो या व्हिडिओत म्हणतोय की, 'मी स्वतःच्या धुंदीत असतो. सोशल मीडियावर मी कुठे असतो. तसेच मी सोशल मीडियाचा वापर कुठे करतो. मी कायमच माझ्या धुंदीत असतो. मी अलविदा केलेलं नाही. मी कुठेही जात नाही. या अगोदरही मी मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधतचं होतो. आता मीडियाची जबाबदारी आणखा वाढलीय. आता त्यांच्या माध्यमातून मी चाहत्यांशी जोडला जाणार आहे.'


आमिर खानने सोशल मीडिया सोडण्याचा घेतला निर्णय 


सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत आमिरने जाहीर केले आहे की, आता मी सोशल मीडियाचा निरोप घेत आहे. आमिरच्या या घोषणेने सर्वांनाच चकित केले आहे. त्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, "माझ्या वाढदिवसा निमित्तने तुम्ही शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल धन्यवाद. मला खूप आनंद झाला. ही माझी सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट आहे."


पुढे त्याने लिहिले "akppl_official हा माझा official contact चॅनल असेल. भविष्यात माझ्या आणि माझ्या Movies बद्दलचे सगळे updates तुम्हाला तिथेचं मिळतील.